कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना रासायनिक खते देतांनी लिंकिंगचा आग्रह धरू नये.युरिया खत खरेदी करत असतानां अनेक ठिकाणी लिंकिंग चा आग्रह धरला जातो.
ता-राहाता व ता- संगमनेर. :- शेतकऱ्यांनी खते व कीटकनाशके खरेदी करण्यासाठी लगबग सुरू केली. त्यातच रासायनिक खत उत्पादक कंपन्या व काही खत विक्रेते हे जबरदस्तीने लिंकिंग करून शेतकऱ्यांना लागत नसलेले उत्पादने गरज नसतानाही शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याची तक्रार अनेक वेळा राहता तालुक्यातील व संगमनेर तालुक्यातील शेतकरी करत आहे.अनेक शेतकरी युरिया खत मागत असताना काही कृषी केंद्र चालकांकडे खताचा स्टॉक असताना युरिया खत देत नाहीत. तर काही ठिकाणी लिंकिंग खताचा आग्रह धरला जातो तरच युरिया उपलब्ध करून देतो असे कृषी केंद्र चालकाकडून सांगितले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना गरज नसतानां मोठा नाहकत्रास सहन करावा लागतो.तरी सुद्धा काही ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रकरणे तालुक्यात होत आहे. ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष विकास म्हस्के व विनायक चौधरी यांनी तालुका कृषी अधिकारी राहाता व तालुका कृषी अधिकारी संगणमेर यांनी तातडीने लक्ष द्या. व शेतकऱ्यांची लुटणार होणार नाही यासंदर्भात आपण तातडीने लक्ष घाला व सर्व तालुक्यातील कृषी सेवा केंद्र यांना सूचना द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.त्या संदर्भात सर्व शेतकरी बंधूंना कळविण्यात येत आहे की, जर कृषी सेवा केंद्र यांनी युरिया सोबत खते घ्या असा आग्रह धरला असेल तर त्वरित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.













