
पतीची राहत्या घरात आत्महत्या व पत्नीची शेततळ्यात आत्महत्या दोन जणांनी आपली जीवनयात्रा संपवली.
दिनांक:- 10 जुलै 2025
गोगलगाव परिसरात खळबळ….
आत्महत्यात मृत झालेले व्यक्तीचे नावे रेवजी मुरलीधर गायकर ( 60 वर्ष) आणि पत्नी नंदा रेवजी गायकर (54 वर्ष ) असे असून ते गाव गोगलगाव तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी असून शिक्षित परिवार आहे.गावापासून जवळच सादतपूर हद्दीत गायकर वस्तीवर राहणारे रेवजी गायकर हे प्रवरा शिक्षण संस्थेत नोकरीत होते. पत्नी, एक मुलगा, तीन मुली असे त्यांचे कुटुंब. चारही मुलांचे विवाह झाले. मुली त्यांच्या सासरी गेल्या तर मुलगा नोकरीसाठी संभाजीनगरला गेला. घरी पती-पत्नी दोघेच होते. रेवजी यांनी तीन वर्षे आधीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारत नोकरी सोडली. त्यांना पेन्शनही मिळू लागली. पोटापुरती शेती असल्याने दोघे शेतातील कामे करून चांगले जीवन जगत होते.
त्यांची एक मुलगी निमगावजाळी ता. संगमनेर येथे सासरी रहाते. तिने गुरुवारी सकाळपासून अनेकदा आई-वडिलांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी तिने जवळच राहणाऱ्या चुलत भावाला संपर्क साधून विचारणा केली. चुलत भाऊ रेवजी यांच्या घरी गेला असता दरवाजा अर्धवट उघडा दिसला. आवाज देऊनही काहीच प्रतिउत्तर न आल्याने दरवाजा पूर्ण उघडून बघितले असता रेवजी जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आणि त्यांच्या तोंडातून फेस आलेला बघून त्याने आजूबाजूच्या लोकांना बोलावले. राहाता तालुका दूध संघाचे उपाध्यक्ष त्र्यंबक पाटील गायकर व पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखाना चे संचालक रामप्रसाद पाटील मगर घटनास्थळी पोहचले. परिस्थिती लक्षात येताच त्यांनी आश्वी पोलिसांना कळवले.
दरम्यान, रेवजी यांच्या पत्नी नंदा यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, घराजवळच त्यांच्या शेततळ्यात नंदा यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा घटनास्थळी पंचनामा करून ते प्रवरा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांवर गोगलगाव येथील स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात आले. घटनेने गोगलगावमध्ये शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच याच गावात दोन भावांचा ओढ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. रेवजी व नंदा यांचा मृत्यू कशामुळे झाला हे सध्या कुणीच सांगू शकत नाही. रेवजी यांच्या तोंडातून फेस आल्याचे दिसून आल्याने त्यांनी विष प्राशन केले की त्यांना कुणी पाजले, हे तपासात समोर येईल. नंदा यांचा मृतदेह शेततळ्यात आढळल्याने त्या पाय घसरून पडल्या की त्यांचा घातपात झाला, याचाही तपास आश्वी पोलिसांना करावा लागणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील पती रेवजी मुरलीधर गायकर यांनी गुरुवारी सकाळी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली. व पत्नी नंदा र गायकर यांची सकाळी शेततळ्यात आत्महत्या केली असून कोणत्या कारणातून केले, हे समजू शकले नसून या घटनेची आश्वी पोलिसात नोंद झाली आहे. ही घटना दिनांक 10 जुलै 2025 रोजी सकाळची ठीक अकरा वाजता निदर्शनात आली.
आत्महत्याचे कारण अस्पष्ट : सदर घटनेचा तपास आश्वी पोलीस स्टेशन करत आहे , अद्याप नेमके कारण समजू शकले नाही.















